Powered By Blogger

Wednesday, November 17, 2021

ललना..! :-)

 


गालबोट घेऊन हळदीचे

सौभाग्याचे धनी झालेत,

आतुर कामातुर ललनेचे 

काजळही ऋणी झालेत..!

- ✍ मृदुंग®

#kshan #writer #author 

 


Monday, July 26, 2021

राजा आणि रंक..! :-)

 ..आपल्या घरात आपण राजा आणि आपणच रंक असतो. त्यामुळे आलेल्या राजाचे राजासारखे आणि रंकाचे रंकासारखेच आदरातिथ्य करावे. कारण घर आपल्या कष्टाचं, संस्कारांच आणि पिढीचं वडिलोपार्जित आहे. त्यात हुकूमशाही पण आपलीच आणि राज्यही आपलेच असते. कारण चौकटीत आलेली शूर्पणखा आणि रावण आपला मृत्यू सोबत घेऊन गेले होते. दान मागितले म्हणूनच मिळते हे विधीलिखित दानपत्रात खोडले जाऊन मृत्यूने अधोरेखित केले जाते. त्यामुळे एखाद्याच्या घरात पायतानासकट वावरण्यास मुभा मिळाली याचा अर्थ त्यांच्या घराची दार बाहेर जाण्यासाठी उघडे आणि पायातली पायताने चिखलाने भरलेला रस्ता तुडवण्यासाठी सुसज्ज असावी असे सुचवितात. कारण काही मनावरची लक्तरे रुतलेल्या खिळ्यासारखी आयुष्यभर वागवावी लागतात. ती प्रवासात थांबून काढताही येत नाही आणि पुढे चालताही येत नाही. जे थांबले ती जोडपी एकटी होतात आणि जी चालत राहतात ती सोबत असतात एकमेकांकडे विरुद्ध तोंड करुन..!

- ✍ मृदुंग®

kshanatch@gmail.com

+९१ ७३८७९ २२८४३


#writer #author #books #stories #attitude #igo #culture #doublestandard 

 



Wednesday, July 21, 2021

डास..! :-)

 डास..!


..शिक्षण जास्त असणाऱ्यांच्या पदरात परिस्थितीने कायम काही ना काही कमी पडत असते. त्यांची भूक प्रत्येक बाबतीत अधाशी बकासुरासारखी असते. अन् त्यांना हेवा कायम दुसऱ्याचा वाटत राहतो. अशी लोक आरशासमोर जात नाहीत. कायम दुसऱ्याच्या नजरेतून स्वतःच आयुष्य आणि स्वतःच्या नजरेतून इतरांचे आयुष्य बघत राहतात. त्यामूळे ना परिस्थिती बदलते ना समाज घडतो. निव्वळ डासांसारखी त्यांची भूनभून करणारी पैदास वाढत राहते..!

(मॉस्किटो किलर)

- ✍ मृदुंग®

kshanatch@gmail.com

+९१ ७३८७९ २२८४३


#writer #mosquitohunter #killer #shayar #lifelessons #struggle #writersblock #coffee 

 



Saturday, July 17, 2021

लॉटरी..! :-)

 लॉटरी..!


..आपली परिस्थिती बदलण्यासाठी लग्नाचा आधार घेतल्यावर; बदललेल्या आणि सध्या असलेल्या परिस्थितीबद्दल असूया व्यक्तीच्या मनात खरचं असू शकते का? नाते औपचारिक झाल्यावर माणूस यंत्र होतो अन् त्याच्या कृती यांत्रिक! आपली परिस्थिती बदलण्यासाठी लग्न एकमेव पर्याय ज्यांना वाटतो; ते लॉटरीच्या तिकीटासारखे आयुष्य जगतात. ज्यांचं नाण खणखणीत असते त्यांचे हरवलेले नाणेही भरभराट करत असते. पण! परिस्थितीने आणि परिस्थितीमुळे लाचार बनलेल्या किंवा झालेल्यांना हे कळत नाही..!

- ✍ मृदुंग®

kshanatch@gmail.com

+९१ ७३८७९ २२८४३


#lottery #writer #author #books #stories #writersblock #thoughts #sympathy 

 



Saturday, July 3, 2021

शोकांतिका..! :-)

 ..ज्याप्रकारे लग्न लादलं जातं त्याचप्रकारे आईपण आणि बापपण होणंही समाजातून लादलंच जातं. त्यामुळे आजचे आई-वडिल हे मुलांचे निव्वळ पालक होतात. मुलांचे संगोपन करणारे सामाजिक घटक दुसरेच बनतात. आणि मुलं हाताबाहेर गेलेली केस बनतात ही शोकांतिका आहे..!

- ✍ मृदुंग®


#writer #author #books #thoughts #life #parents #partner 

 



Thursday, July 1, 2021

अघोर..! :-)

 .. तंत्रविद्येत तेवणाऱ्या दिव्यावर फुंकलेल्या हळदीचेही दुष्परिणाम होतात.. जखम भरणारी हळद जीव घेणारी कशी होऊन जाते? थांगपत्ताही लागत नाही.. अघोरी सत्य एवढं विद्रूप असतं.. दिवंगत असतं आणि शाश्वतही..!

(अघोर)

- ✍ मृदुंग®


#aghora #writer #club #author #mystery #midnight #scared #scary 

 



Sunday, June 27, 2021

नैराश्य..!

 .. बितनाऱ्या परिस्थितीतून आणि घटनांमधून आत्महत्येचे पर्याय माणसाच्या समोर येऊन निर्णय होत असावेत. असून चिंता आणि नसून काळजी यात माणसाची जिंदगी घासली जात असल्यावर कुणाचा विचार आणि परिणामांची फिकीर करण्याची इच्छा माणसाला होत नाही एवढं नैराश्य त्याला घट्ट चिकटले असते..!

- ✍ मृदुंग®